ब्लॉगवर आपले स्वागत आहे

सोमवार, १५ मार्च, २०१०

नैराश्य

माहित नाही का पण गेल्या काही दिवसांपासून खुप नैराश्य आणि फ्रस्ट्रेशन आलय ...... काहीच करावस वाटत नाही .....ऑफिस मध्ये पण कामात लक्ष लागत नाहिये.... कोणताच काम धड होत नाहिये ...... मन फार विचित्र झालय..... कसलाही उत्साह नाही .... कसलाही आनंद नाही ...... अगदी टिव्ही पहवासाही वाटत नाहीये ..... वाचन करावास वाटत नाहिये... बोलावस वाटत नाहीये ........ खुप बैचेनी आणि उदासीनता आलिय ...... कधी आणि कशी यातून बाहेर पडेन माहीत नाही ...... मन मनास उमगत नाही .... मज तुझी .................

गुरुवार, ४ मार्च, २०१०

नम्र विनंती

ब्लॉगर मित्र आणि मैत्रणीना एक नम्र विनंती कराविशी वाटते ..... कृपया सगळ्यांचे ईमेल आयडी टाकुन मेल पाठवण्याचा प्रकार थांबवा ......... मेल वाचण्यासाठी खरच वेळ नसतो ....... जो वेळ आहे तो मेल वाचण्यात आणि ते वैतागुन डिलीट करण्यात घालावण्यापेक्षा ब्लॉग वाचण्यात घालवावा आणि सत्कारणी लावावा असे वाटते.... मेल आपण आपल्या परिचिताना पाठवावेत आणि सहकार्य करावे....... धन्यवाद ..... या विषयासाठी ब्लॉग वर पोस्ट टाकल्याबद्दल क्षमस्व.......

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

शुक शुक .... कुठे गेला तो?

मिड डे मध्ये आलेल्या बातमीनुसार माननीय छगन भूजबळ यांचा रुपये तीन लाख किमतीचा पोपट त्यांच्या रामटेक या निवासस्थानावरून हरवला आणि तब्बल तीन दिवस मुंबई पोलिस, भुजबळसाहेबांचे सुरक्षारक्षक आणि पक्षकार्यकर्ते अतिमहत्वाच्या 'पोपट शोधमोहिमेत' व्यस्त होते...... शेवटी काल दुपारी २ वाजता हे पोपट महाशय दिलीप वळसे पाटिल यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या नारलाच्या झाडावर बसलेले दिसले..... त्यानंतरही अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर ह्या पोपटाला पकडण्यात यश आले....... या सर्व प्रकारात बऱ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत, पण त्यातील ३ महत्वाच्या ------ १) पोलिसाना या प्रकारची अतिमहत्वाची कामे असतात २)पोलिस पक्ष्याइतकेच महत्व गुन्हेगार पकड़ण्याच्या कामाला देऊन इतकी चपलता दाखवू शकत नाहीत का? ३) भुजबळसाहेब अमेरिकन जातीचा रुपये ३ लाख किमतीचा पोपट घरी जतन करू शकतात मात्र त्यांच्या राज्यातील जनता कांदे, भाज्या कशा परवडणार याचा विचार करत राहते

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

ब्रेकिंग न्यूज

काल रात्री टिव्ही ऑन केला तर जवळ जवळ सगळ्याच चेनेल वर एक ब्रेकिंग न्यूज - ३ तासांत ३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या..... ही बातमी खुपच हायलाईट केली जात होती .... सकाळी पेपर मध्ये पण बारावीच्या २ मुलींच्या आत्महत्येची बातमी ..... ह्या बातमीला अवास्तव रंजित करून दाखवल जातय असा वाटतय..... सध्या परीक्षा जवळ आल्या आहेत ... विद्यार्थी आधीच टेंशन मध्ये आहेत ... अशा बातम्यांच जर वारंवार ह्यामरिंग होत राहिल तर कमकुवत मनाची आणखी मुलं हा मार्ग स्वीकारतील आणि हे प्रमाण अजुन वाढेल ..... मुलांची मनस्थिति आधीच तणावग्रस्त आहे अशा परिस्थितीत सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हायला हावी..... पण अगदी विरुद्ध वातावरणनिर्मिती होत आहे ....
मुलांच्या मनावर परिणाम होईलच पण त्याचबरोबर पालकही मुलाना अभ्यास कर अस निर्धास्तपणे सांगू शकणार नाहीत .... आपल्या बोलण्याचा टेंशन घेउन आपल पाल्य चुकीचा मार्ग तर स्वीकारणार नाही ना ही भीती त्यांच्या मनात सतत राहिल .....
वर्तमानपत्र आणि टिव्ही वर या बातम्यांची प्रसिद्धि थांबवावी अस माझ तरी स्पष्ट मत आहे ......

शुक्रवार, ११ डिसेंबर, २००९

आपल्यासाठी वेळ नसावा?

आपण मनापासून प्रेम कराव... अगदी मनापासुन प्रत्येक आवडनिवड जपण्याचा प्रयत्न करावा.... प्रेमाच्या व्यक्तीसाठी काहीही कराव .... प्रत्येकवेळी भेटायला बोलावल्यावर हातात असलेली नसलेली महत्वाची बिनामाहत्वाची काम बाजूला ठेउन अगदी दुनियेला बाजूला सारून भेटायला जाव... अर्थात ही भेट आपल्यालाही हवीहवीशी असते ..... पण कधी आपण भेटायला बोलवाव..... अगदी मन अस्वस्थ आहे म्हणून ... आणि थोड़ी आडजस्टमेंट करून भेटन सहज शक्य असताना ती करून भेटायला येऊ नये...... काय बोलायच .... प्रत्येक वेळी स्वताच्या कामांचाच तेवढा सोयीस्कर विचार करायचा आणि मला मात्र प्रेमापुढे काहीच दुसर दिसत नाही.... मनस्थिति ठीक नसताना अपेक्षीत भेट न झाल्याने मन अजुन उदास ....

भय इथले संपत नाही....

काल ऑफिसच्या कामासाठी दमणला गेले होते ..... दुपारी एक मीटिंग होती.... बैंकेतुन काही रक्कम काढून त्या व्यक्तीला देऊन एक व्यवहार पूर्ण करायचा होता.... साधारण दोनच्या सुमारास ऑफिसमधून निघाले .... रक्कम काढली आणि त्या कन्सल्तंतच्या ऑफिस कड़े निघाले .... त्यांच्या मूळ ओफिसचे काम चालू आहे ... म्हणून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर सध्या भाड्याने दुसरे ऑफिस घेतले आहे.... ह्या ऑफिसची बिल्डिंग सिनेमागृहाला लागुन आहे.... माझी कार तिथे पोचायला आणि सिनेमा सुटायला एकच गाठ पडली..... दमण हे ठिकाण म्हणजे दारू आणि दारुडे मुबलक..... गुजरात मधे दारुबंदी आहे... बरीचशी गर्दी दमणला दारू ढोसन्यासाठी होते... तर... एकदम गर्दी बाहेर आली .... एक साधारण १८ ते २० वर्षाचा मुलगा कार जवळ आला आणि माझ्या बाजुचा दरवाजा त्याने उघडला... आणि काही बोलला .... पिउन तर्र.... तो काय बोलला हे मला समजल नाही म्हणून मी बाजुच्या सिटवर बसलेल्या ड्राईवर कड़े पाहिला तर तोच मला विचारतो तो काय बोलतोय.... लगेच दुसऱ्या क्षणी मी गाडीचा दरवाजा आत ओढून घेतला... त्या मवाल्याने तो जोरात पकडून धरला होता पण देवाच्या कृपेने मी दरवाजा लावून घेण्यात यशस्वी झाले..... ड्राईवरला कार लॉक करायला सांगितली..... तो मुलगा कार जवळून हलेना .... तिथे जवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या मुलाला शिव्या घालून मारायला लागला...... मी ज्यांना भेटायला गेले होते त्यांना फ़ोन केला ... ते म्हणाले मी पाठवतो कोणाला तरी खाली ..... तोवर या मुलाने अजुन कार च्या आसपास कोणाकोणाला मारायला सुरुवात केली ..... मला गाड़ीतुन उतरण कठीण झाल होता.... मी परत फ़ोन करून त्यांना तुम्ही स्वतः खाली या, मी वर येऊ शकत नाही असा सांगितल.... त्यावर ते ओके म्हणाले ... पण समोरची बिघडत चाललेली परिस्थिति पाहून मी ड्राईवरला कार परत फिरवून घ्यायला सांगितली ... जशी कार टर्न करायला सुरुवात केली तसा तो मुलगा गाड़ी जवळ येउन गाड़ीवर मारायला लागला .... ड्राईवरच्या बाजुचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागला ... गाड़ी फिरवून अपोसिट रोडवर आणण्यात आम्ही यशस्वी झालो ... तो परत तिथे अजुन कोणाला मारत राहिला .... इतकी गर्दी जमा झाली होती रोडवर पण सगळे बघे.... ४ लोकानी धरून त्याला दोन लगावल्या असत्या तरी त्याने काढता पाय घेतला असता ... पण कोणी पुढे येउन तसे केला नाही ....ज्यांना फोन केला ते आले होते तेवढ्यात खाली आले ... मी कार मधून बाहेर पडलेच नाही... मीटिंग आणि व्यवहार कार मध्ये पार पाडला ... आणि परत ऑफिसला आले..... एका महिन्याच्या आतच असा दूसरा किस्सा घडल्याने मन जरा उदास झालय... थोड़ी भीती थोड़ा टेंशन .... दिवसाच्या अशा घटना घडतात ... बघणारे बघतात, ज्यांनच्या सोबत घडतात ते काही दिवस टेंशन घेउन बसतात आणि कायदा आणि सुरक्षेचे रखवालदार झोपा काढतात ...... घरी आईला नाही सांगितल कारण ती आधीच्याच प्रकारातुन बाहेर आलेली नाहीये ... हे सांगितल तर उगाच टेंशन घेउन बसेल ... तुर्तास माझ्यासाठी तरी काळ वाईट दिसतोय..... अधिक सावध रहायला हवे .....

गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

मुर्खपणाचा कळस

आजच्या मिड डे मध्ये एक बातमी आली आहे .... त्यानुसार रेलवे प्रशासनाकडे प्रवाश्यांच्या काही सूचना, तक्रार, मागण्या आल्या आहेत ...... त्यामध्ये एक अनामिक प्रवाशाने 'पान / मावा खावुन थूंकण्यासाठी खिडकीला गज नसावेत' अशी फालतू मागणी केली आहे ..... आताही गज असताना सगळ्या प्रकारचा कचरा खिडकीतुन बाहेर टाकला जातोच...... आता यांना थूंकण्यासाठी गज नकोत ..... अशी मागणी करण्यापूर्वी एकदाही सुरक्षतेचा विचार मनात आला नाही? ट्रेनमध्ये भिरकावलेल्या दगडांच्या केसेस विसरले काय? असल्या फालतू मागण्या करताना लाजही वाटू नये ?