ब्लॉगवर आपले स्वागत आहे

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

शुक शुक .... कुठे गेला तो?

मिड डे मध्ये आलेल्या बातमीनुसार माननीय छगन भूजबळ यांचा रुपये तीन लाख किमतीचा पोपट त्यांच्या रामटेक या निवासस्थानावरून हरवला आणि तब्बल तीन दिवस मुंबई पोलिस, भुजबळसाहेबांचे सुरक्षारक्षक आणि पक्षकार्यकर्ते अतिमहत्वाच्या 'पोपट शोधमोहिमेत' व्यस्त होते...... शेवटी काल दुपारी २ वाजता हे पोपट महाशय दिलीप वळसे पाटिल यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या नारलाच्या झाडावर बसलेले दिसले..... त्यानंतरही अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर ह्या पोपटाला पकडण्यात यश आले....... या सर्व प्रकारात बऱ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत, पण त्यातील ३ महत्वाच्या ------ १) पोलिसाना या प्रकारची अतिमहत्वाची कामे असतात २)पोलिस पक्ष्याइतकेच महत्व गुन्हेगार पकड़ण्याच्या कामाला देऊन इतकी चपलता दाखवू शकत नाहीत का? ३) भुजबळसाहेब अमेरिकन जातीचा रुपये ३ लाख किमतीचा पोपट घरी जतन करू शकतात मात्र त्यांच्या राज्यातील जनता कांदे, भाज्या कशा परवडणार याचा विचार करत राहते

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

ब्रेकिंग न्यूज

काल रात्री टिव्ही ऑन केला तर जवळ जवळ सगळ्याच चेनेल वर एक ब्रेकिंग न्यूज - ३ तासांत ३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या..... ही बातमी खुपच हायलाईट केली जात होती .... सकाळी पेपर मध्ये पण बारावीच्या २ मुलींच्या आत्महत्येची बातमी ..... ह्या बातमीला अवास्तव रंजित करून दाखवल जातय असा वाटतय..... सध्या परीक्षा जवळ आल्या आहेत ... विद्यार्थी आधीच टेंशन मध्ये आहेत ... अशा बातम्यांच जर वारंवार ह्यामरिंग होत राहिल तर कमकुवत मनाची आणखी मुलं हा मार्ग स्वीकारतील आणि हे प्रमाण अजुन वाढेल ..... मुलांची मनस्थिति आधीच तणावग्रस्त आहे अशा परिस्थितीत सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हायला हावी..... पण अगदी विरुद्ध वातावरणनिर्मिती होत आहे ....
मुलांच्या मनावर परिणाम होईलच पण त्याचबरोबर पालकही मुलाना अभ्यास कर अस निर्धास्तपणे सांगू शकणार नाहीत .... आपल्या बोलण्याचा टेंशन घेउन आपल पाल्य चुकीचा मार्ग तर स्वीकारणार नाही ना ही भीती त्यांच्या मनात सतत राहिल .....
वर्तमानपत्र आणि टिव्ही वर या बातम्यांची प्रसिद्धि थांबवावी अस माझ तरी स्पष्ट मत आहे ......