ब्लॉगवर आपले स्वागत आहे

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

वाढते व.....

लहानपणी ’काय बाई सांगु, कसं गं सांगु, मलाच माझी वाटे लाज, वजनाचा काटा मोडला आज’ हे गाण गाउन जाड्या लोकांची जाम टर उडवायचो आम्ही. खुप हसायचो. तेव्हा गम्मत वाटायची, पण आता...... हल्ली वजन जरा अंमळ जास्तच वाढलय. जास्त म्हणजे दिवसातुन एकदा तरी वजन वाढतय कमी करा अशी कमेंट ऎकायला मिळ्ते आणि ते कमी करण्य़ासाठी उपायही सुचवले जातात. उपाय अनेक उदा.
१) दुधीभोपळ्याचा रस अथवा पावडर खा २) जीम जॉईन करा ३) हाय कॅलरी फुड बंद करा ४) अमुक गोळ्या सुरु करा ५) अमुक डायटिशन कडे जा ६) फक्त फळ, सुप आणि सॅलेड खा, इतर जेवण बंद करा ७) सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात मध आणि लिंबु घालुन प्या ८) माझे सगळे आवडते पदार्थ (पावभाजी, वडापाव, पिझ्झा, चॉकलेट, आइसक्रिम, समोसा, वेफर आणि बरेच..) ज्यांची गणना जंक फुड मध्ये होते ते बंद करणे. ९) दिवसभर गरम पाणी पित राहणे. असे आणि असे अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत.

हे सगळ ऎकुन त्रस्त झालेय मी आणि वजन कमी करायचा निर्णय घेतलाय. अर्थात लोकांच्या कमेंट्स हे एकमेव कारण नाहि तर हल्ली चालण्याचा वेग जरा मंदावल्यासारखा वाटतोय आणि वजन अजुन प्रमाणाबाहेर वाढले तर कमी करणे कठीण जाईल असे वाटतय. तर ... एकुण ८ किलो वजन कमी करण्याचा मानस आहे. इतक वजन कमी करायला किमान एक वर्ष तरी लागेल अस अनुभवी लोकांच मत आहे. त्यासाठी काही झेपतील(?) असे अत्याचार स्वत:वर करणार आहे - १) रोज १ तास (किमान अर्धा तास) चालणे (नेमकं कधी हा मोठा प्रश्न आहे ) २) भात(खुप कठिण आहे), बटाटा आणि साखर बंद करणे ३) रोज ३ लिटर (खुप होतं हे) पाणी पिणे ४) सो कॉल्ड ’जंक’ फुड बंद (जुलुम) ५) रात्री जमल्यास न जेवता फक्त सुप आणि फळांवर राहणे (हा पर्याय मी लास्टला ठेवलाय)
हे सगळं काल ठरवल आणि आज सकाळी नेहमीप्रमाणे निद्रादेवीचा विजय झाला आणि चालायला जायचं राहिलं. सकाळपासुन ३ चहा झाले त्यात एक बिनसाखरेचा होता. दुपारी डबा खाताना कोणाच्या तरी डब्यातुन आलेला ’पालक पनीर आणि आलुफ्राय’ खाल्ल (नाहि म्हटल तर समोरच्याला वाईट वाटेल म्हणुन). पाणी फक्त दोन ग्लास प्यायल गेलाय. आणि ऑफिस मध्ये एकाचा वाढदिवस आहे तर आइसक्रिम मागवलय. असो आज जरी माझ्या वेट कंट्रोल प्लानचे बारा वाजले असले तरी मी अजुन हार मानली नाहीये. हे मिशन पार पाडायचेच आहे.

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

झू झू - आता वाजले की बारा

जाहिरात क्षेत्रातील क्रिएटीव्हिटीला दाद द्यावी तितकी थोडीच आहे... अनेकदा मूळ कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच जास्त मनोरंजक असतात ..... पूर्वी लहानपणी एखादा कार्यक्रम पहाताना मध्ये जाहिरात लागली की व्यत्यत आल्या सारख वाटायच कारण पूर्वी कार्यक्रमच दर्जेदार असायचे .... पण आता काही जाहिराती दर्जेदार असतात ..... वोडाफोनच्या 'झू झू ' च्या जाहिराती अशाच आनंद देणार्या आहेत .... हे 'झू झू' आणि त्यांच्या जाहिराती मला जाम आवडतात ... (माझ्या डेस्कटॉपवर, प्रोफाइलवर तुम्हाला झू झू सापडेल :) ).... हल्ली नुकतीच मैत्रिणीने तिच्या सेल वर एक विडियो क्लिप दाखवली .... मस्त आहे .... बघा तुम्हालाही आवडेल ..... आवडली तर जरुर सांगा