ब्लॉगवर आपले स्वागत आहे

बुधवार, १४ ऑक्टोबर, २००९

जपून चाल रे जीवा

आयुष्यात आपण अनेक माणसांना भेटत असतो.... काही लक्षात राहतात, काही नाही.... तसेच आपल्यालाही कोणी लक्षात ठेवत असेल कोणी नाही.... बरेचदा इतरांशी वागताना खुप बेफिकिरेने वागला जात... कधी आपल्या कळत , कधी नकळत..... प्रत्येक जण एकमेकाच निरिक्षण करत असतो आणि बऱ्याच गोष्टी टिपत असतो ... त्यावरून चांगल वाईट मत ही बनवत असतो .... वागण्या - बोलण्यात सतर्कता ही नेहमीच आवश्यक असते.... हे सगळ लिहिण्याच कारण म्हणजे गेल्या आठवड्यात जुन्या ऑफिस मध्ये जाण्याचा योग आला.... ऑफिस मध्ये गप्पा चालल्या होत्या.... तेवढ्यात एक इन्दोरवरून कस्टमर आला.... सगळ्याना हाय हँलो करत माझ्याकडे वळला आणि म्हणाला "नमस्कार, आप सारिकादिदी है ना? मैं १९९७ में आपके ऑफिसमें पहेली बार आया था तब आपसेहि मुलाकात हुई थी। उस वक्त आपके हाथका लिखा हुआ पेपर आजभी मैंने संभालके रखा है। उसवक्त मेरे बिज़नस की शुरुवात थी और आपने काफी सपोर्ट किया था। आणि मग इतर बिज़नसविषयी गप्पा सुरु झाल्या... असाच काल एका जुन्या सहकारयाचा फ़ोन आला होता .... म्हणाला " आपने मुझे एक डिक्शनेरी और पेन गिफ्ट दिया था। आपको शायद याद ना हो पर मैंने अभीतक संभलके रखा है। " सांगायचा मुद्दा हा की ह्या दोन्ही व्यक्तिनी चांगल्या आठवणी जपून ठेवल्या.... त्यांचा स्वभाव चांगल ते जतन करण्याचा असावा ..... अशाही व्यक्ति असतील ज्यांनी वाईट प्रसंग मनात ठेवले असतील..... जपून चाल रे जीवा ... आसपासची माणस तुझ्या वागण्याच निरिक्षण करत असतात आणि परिक्षण पण ... जबाबदारी वाढली आहे .... तेव्हा जपून ...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा