ब्लॉगवर आपले स्वागत आहे

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

संवाद

ब: चेहरा असा का दिसतोय? काय झाल?
अ: काही नाही
ब: सांग ना .... कोणी काही बोलल का?
अ: नाही
ब: मग उदास का?
अ: हम्म
ब: प्लीज़ ..... सांग ना....... मला सांगणार नाहीस ?
अ: --------
ब: (चेहरा दोन्ही हातात घेउन) हे बघ , तू सांगितल्याशिवाय मी इथून हलणारही नाही....
( सगळ भड़भड़ा बोलल जात ..... मन हलक होत).... दुरून गाण्याचे स्वर कानावर येतात ...... 'आजा पिया तोहे प्यार दूँ .... किसलिये तू इतना उदास' ............
नकळत दोघांच्याही चेहर्यावर हसू उमलत......
*********************************************************************************************
५ वर्षानंतर ...............
ब: चेहरा कशाला पडलाय ? रोज रोज पडलेला चेहरा पहायचा मला कंटाला आलाय ..... काय झाल आता?
अ: काही नाही ......
ब: बोल पटकन काय झाल ते ..... नाहीतर नंतर म्हणशील मी विचारल नाही म्हणून .....
अ: काही नाही झाल .....
ब: काही झाल नाहीतर चेहरा पाडून कशाला बसायच ....
अ: ह्म्म्म
ब: शेवटच विचारते , सांगणार आहेस का नीट?
अ: ---------
ब: ओके ... जशी तुझी मर्जी .... नको बोलूस .... नंतर मात्र म्हणू नकोस मी विचारल नाही किंवा वेळ दिला नाही म्हणून
( पुढे कोणी काही बोलत नाही .... मन अजुन दुखावली जातात ....)...... दुरून गाण्याचे स्वर कानावर येतात ...... ' रहते थे कभी जिनके दिल में हम जानसेभी प्यारोंकी तरह....'
दोघही आपापल्या दिशेने चालु लागतात ........

( पुढे कोणी

बुधवार, १७ मार्च, २०१०

श्री स्वामी समर्थ

काल श्री स्वामी समर्थ जयंती ... त्या निमित्ताने मठात जायचे होते .... सकाळी ऑफिसला जाण्याआधी काही कारणाने जायला मिळाले नाही... मग संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर जाऊ अस ठरवल ..... अंधेरी लोखंडवाला येथे स्वामींचा मठ आहे .... चार वर्षांपूर्वी माझ ऑफिस अंधेरी वेस्टला शिफ्ट झाल ... पण जायचा योग आला नव्हता ... काही झाल तरी आज नक्की जायच अस ठरवल .....
माझे बॉस(वय वर्षे ६५, मारवाड़ी) या मठाच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये रहातात ... साधारण ४ च्या सुमारास मी त्यांना म्हटल ' मला तुमच्या घरासमोरच्या मंदिरात जायचे आहे .... तेव्हा संध्याकाळी तिथे मला सोडा' तर 'हो' म्हणाले .... आमच्यात पुढे झालेला संवाद -
मी: गर्दी असेल ना ?
बॉस: गर्दी? वहाँ क्या है? कोई जाता है?
मी: हाँ, वहाँ मंदिर है।
बॉस(कुत्सितपणे): यूपीवाले बाबा की न्यूज सुनी थी कल
माझ डोक सटकल
मी: उस न्यूज से इसका क्या रिलेशन ? व्हाटस दी पॉइंट ऑफ़ कमप्यारीजन?
बॉस गप्प ...
मी: व्हाय यू गो टू शिर्डी सो ऑफ़न ?
या प्रश्नावर उत्तर नाही? राग आला असावा... समोरून निघून गेले... ही मंडळी दर ४/६ महिन्यांनी शिर्डीला जातात... यांच्या मनात भाव / श्रद्धा किती मला खरच माहित नाही ..... 'साईंसत्चरित' नावाचा 'हेमाडपंतांनि लिहिलेला ग्रन्थ आहे हे यांना माहिती नाही .... म्हाळसापति, हेमाडपंत, चांदोरकर कोण हे यांच्या गावीही नसावे ... असो .... 'जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव'... शिर्डी प्रसिद्धि झोतात आहे म्हणून माहीत असेल आणि जात असावेत .... काहीही असो .... पण जर दुसर्यांच्या श्रद्धास्थानाबद्दल माहिती नसेल तर उगाच कोणतीही कमेन्ट करू नये अथवा तिरस्कार व्यक्त करू नये असे माझे स्पष्ट मत आहे ...
मला खुपच राग आला होता .... ऑफिस सुटल्यावर बॉसच तोंडही न पाहता निघाले.... रिक्शा केली आणि सरळ मठात पोचले ....४ वर्षानंतर आले .... स्वामींची इच्छा ..... हा मठ खुप प्रशस्त आणि सुन्दर आहे .... गर्दी होती आणि रांग लावून स्वामींच दर्शन घेतल .... गाभार्यात खुपच सुगंध, प्रसन्नता आणि स्पंदन जाणवली ... नंतर शांतपणे बसून प्रसाद घेउन निघाले .... मन शांत झाल ..... ।। श्री स्वामी समर्थ ।।

मंगळवार, १६ मार्च, २०१०

पाचशेची नोट

काल संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे रिक्षाची वाट पाहत थांबले... वीरा देसाई रोडवरून अंधेरी स्टेशनसाठी रिक्शा मिळन कठीण झालय.... त्यात हल्ली मेट्रोच काम सुरु असल्यामुले स्टेशन ला पोचायला खुप वेळ लागतो आणि रिक्शा यायला तयारही होत नाही ...... अजुन दोन बायका रिक्शासाठी उभ्या होत्या.... एक रिक्शा आली.... त्या दोघिनी विचारल 'नवरंग'? ... तो नाही म्हणाला... मग मी स्टेशन विचारल तर हो म्हणाला ..... चला रिक्शा मिळाली..... आत बसले .... तेवढ्यात एक बाई आली..... साधारण चाळीशिची असेल ..... म्हणाली मलापण स्टेशन ला जायचय ... क्यान आय ज्वाइन?... बाई एकदम हायफाय.... तसाही रिक्शा मिलन प्रोब्लेम असतो , म्हटल ओके .... ती पण बसली .... रिक्शा निघाली ..... मग रस्त्यात मी कुठे जॉब करते, कुठे राहते वगैरे चौकशी तिने माझी केली .... आणि स्वतः ठाण्याला राहते म्हणाली.... मग म्हणाली .... ५०० रु सुट्टे आहेत का ? माझ्याकडे होते पण मी नाही म्हणाले .... न जाणो नोट खोटी असली तर आपल्याला फटका बसायचा ......मग जस स्टेशन जवळ आल तस तिने रिक्शावाल्याला विचारल आपके पास ५०० का छुट्टा है ?..... तोही नाही म्हणाला .... मग मला म्हणते आता मी पैसे कसे देऊ ? मी म्हटल ओके ... मी दिले रिक्षाचे २६रु .... ह्या बाईने सुट्टे १,२ किंवा जे काही सुट्टे असतील ते बघायला / काढायला पर्स ओपनही केली नाही ..... ही फ़क्त ५०० रु नोट घेउनच फिरत असेल का ? मी ओके म्हटल्यावर ही बाई साध थ्यांकयु ही न म्हणता उतरून चालु पडली .... म्हटल जाऊदे ... बहुतेक हिची नोट पण खोटी असावी माझे ५०० रु वाचले किंवा मग हिला अशी फुकट स्टेशन ला जायची सवय असावी .... असो माझा फायदा काही नाही झाला पण नुकसान नाही झाले हे काय कमी आहे ?

सोमवार, १५ मार्च, २०१०

नैराश्य

माहित नाही का पण गेल्या काही दिवसांपासून खुप नैराश्य आणि फ्रस्ट्रेशन आलय ...... काहीच करावस वाटत नाही .....ऑफिस मध्ये पण कामात लक्ष लागत नाहिये.... कोणताच काम धड होत नाहिये ...... मन फार विचित्र झालय..... कसलाही उत्साह नाही .... कसलाही आनंद नाही ...... अगदी टिव्ही पहवासाही वाटत नाहीये ..... वाचन करावास वाटत नाहिये... बोलावस वाटत नाहीये ........ खुप बैचेनी आणि उदासीनता आलिय ...... कधी आणि कशी यातून बाहेर पडेन माहीत नाही ...... मन मनास उमगत नाही .... मज तुझी .................

गुरुवार, ४ मार्च, २०१०

नम्र विनंती

ब्लॉगर मित्र आणि मैत्रणीना एक नम्र विनंती कराविशी वाटते ..... कृपया सगळ्यांचे ईमेल आयडी टाकुन मेल पाठवण्याचा प्रकार थांबवा ......... मेल वाचण्यासाठी खरच वेळ नसतो ....... जो वेळ आहे तो मेल वाचण्यात आणि ते वैतागुन डिलीट करण्यात घालावण्यापेक्षा ब्लॉग वाचण्यात घालवावा आणि सत्कारणी लावावा असे वाटते.... मेल आपण आपल्या परिचिताना पाठवावेत आणि सहकार्य करावे....... धन्यवाद ..... या विषयासाठी ब्लॉग वर पोस्ट टाकल्याबद्दल क्षमस्व.......