ब्लॉगवर आपले स्वागत आहे

बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

मुंबई सुरक्षित आहे का?

शुक्रवार दिनांक १३.११.२००९ रोजी संध्याकाळी साधारण ७.४५ च्या सुमारास मी खारवेस्ट वरून ऑटो पकडली कुर्ला वेस्ट साठी..... खरतर मला कुर्ला ईस्टला जायच होत .... पण ऑटोवाला म्हणाला कुर्ला वेस्ट जाऊंगा.... बैठना है तो बैठो.... मी बसले ... मनात म्हटल कुर्ला वेस्ट तर कुर्ला वेस्ट ..... ऑटो हातची जाऊ द्यायची नव्हती ...... ऑटोने 'बीकेसी'त एंट्री घेतली ... पोलिसांची नाकाबंदी होती नेहमीची.... पुढे गेलो.... लेफ्ट साईडला असलेल्या बीकेसी पोलिसस्टेशनवर नजर पडली ...... इमारतीला काचा असलेला पोलिसस्टेशन.... बाहेरून आतलं सगळ दिसत होत... पॉश एरियाप्रमाणे पॉश पोलिसस्टेशन असा विचार करत पुढे निघाले... बाजुलाच असलेला पेट्रोल पंप क्रॉस केला... सिग्नल क्रॉस केला .... ऑटो पुढे गेली... इतक्यात .... एक बाइक ऑटोच्या राइट साईडला अगदी बाजूला आली..... जवळ जवळ चिकटून.... बाइकवर दोघजण होते.... मला काहीसुचायच्या आतच पाठी बसलेल्या मुलाने ऑटोत हात घालून माझी पर्स खेचून घेतली... आणि लगेच बाइक बाजूला झाली ....मी ओरडायला लागले.... जितक्या शिताफीने त्याने पर्स उचलली तितक्याच शिताफीने तीच पर्स बाइकच्या नम्बरप्लेटवर धरली... मी नम्बर सुद्धा पाहू शकले नाही.... बाइकने स्पीड घेतला .... ऑटोवाल्याने स्पीड वाढवून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण बाइकच्या स्पीड पुढे ऑटोचा काय निभाव लागणार ..... मी ऑटोवाल्याला यु टर्न घ्यायला सांगितला.... ऑटो बीकेसी पोलिस स्टेशनला आणली... आधी पोलिसस्टेशन पाहिल होत तेव्हा कल्पनाही नव्हती की काही मिनिटातच आपल्याला आत जाव लागणार आहे.... आत गेले ..... समोर एका टेबलवर काही हवालदार बसले होते त्याना सांगितल... त्यानी दुसऱ्या एका टेबलवर बसलेल्या हवालादाराकडे जा सांगितल..... तिकडे गेले तर हे हवालदारसाहेब अजुन एक दोन हवालदारसोबत काही रिव्होल्वरच्या नोंदी करत बसले होते..... मला बसायला सांगितल..... अगदी सुवाच्य अक्षरात नोंदी करून झाल्यावर हवालदारसाहेब फ्री झाले..... मग मी पुन्हा काय घडल ते रिपीट केला..... सगळ ऐकल्यावर म्हणाले 'पीएसआय ' साहेब आतमध्ये मोठ्या साहेबांकडे आहेत.... येतील आता लगेच बाहेर..... त्याना सांगा..... यात किती वेळ गेला असेल विचार करा ..... साहेबांची वाट बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता ..... १० /१५ मिनिटांनी साहेब आले .... पुन्हा कैसेट रिपीट केलि...... पर्समध्ये काय काय आहे विचारून घेतल....... रु ३५०० रोख, क्रेडिट कार्ड, 'पेनकार्ड, वाहनचालक परवाना, रेलवेपास, इतर काही मौल्यवान ऐवज आणि ऑफिसचे महत्वाचे काही पेपर होते.... साहेबांनी दोन तिन सिव्हिल ड्रेसमधले हवालदार आणि गाड़ी दिली व पूर्ण एरियात फेरी मारून यायला सांगितले..... आता इतक्या वेळानंतर ते चोर तिथे थांबले असतील का? पण काय करणार..... गेलो.... एक एरियात राउण्डमारून परत आलो ....... मग माझ्या समोर दोन रजिस्टर ठेवली .... आरोपींचे फोटो असलेली .... ओळखा...... काही क्षणातच घडलेली घटना आणि शिवाय अंधार .... चेहरा नीट पाहता आला नाही ...... फोटो नाही ओलखता आला .... बाइकचा नम्बर पाहीला का ? नाही .... पर्स धरली होती...... किती वेळा तेच तेच सांगायचा..... बाइक कोणत्या मेकची होती? मेक पहायला वेळच कुठे होता.... साहेब म्हणाले ' मी जे जे कागदपत्र हरवले त्याचे सर्टिफिकेट देतो, दुसरे बनवून घ्या... पर्स आम्हाला मिळाली, कोणी आणून दिली की तुम्हाला फ़ोन करतो, तुम्हाला काही विचारायचा असेल तर केव्हाही फ़ोन करा' तुम्ही बाइकचा नम्बर पाहिलेला नाही, आरोपींचा वर्णन सांगता येत नाहीये, १०० वेळा पोलिसस्टेशनला खेटे घालावे लागतील, कंप्लेंट नाही पण सर्टिफिकेट देतो, तुमच काम होइल, मी तुम्हाला सहकार्य करतोय, तुम्ही आम्हाला सहकार्य करा'.... असा म्हणून ते सर्टिफिकेट देऊन माझी रात्रि १०.३० वाजता पाठवणी केलि..... आजमितिस काही पर्स मिळालेली नाही....... अजुनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात नाही..... एकट्याने ऑटो मध्ये बसायची पण भीती वाटते ......

शनिवारच्याच टाइम्स मध्ये अशीच घटना ३.११.२००९ बांद्रा वेस्टला घडल्याची बातमी होती.... शोपिंगला जाणार्या दोघी ऑटोवाल्याला भाड़ देत होत्या तेव्हा बाइकवरून दोघानी त्यांची पर्स चोरली.... पुढे पेट्रोल पंप वर त्या चोरानी चोरलेल्या क्रेडिटकार्डचा वापर करून पेट्रोल पण भरलं.... पोलिसाना बाइकचा नम्बर पण मिळाला... पण अजुन काही तपास लागलेला नाही..... रोजच्या पेपरमध्ये अशा बातम्या येत असतात..... जितके गुन्हे घडतात त्याच्या १% पण पेपरमध्ये छापून येत नसतील..... मोर्निंगवॉकला जाणार्या किती स्त्रियांची मंगलसुत्रे चोरीला जातात ...... काय सुरक्षा राहिली आहे मुंबईत ..... आणि पोलिस जर असेच दुर्लक्ष करत राहिले तर पुढे मुंबईची काय परिस्थिति होइल विचार करा ..... रस्त्यावरून चालण्याची सोयही राहणार नाही......

३ टिप्पण्या:

  1. धोंडोपंताच्या ब्लॉग वर ह्या किस्सा वाचला होता. पोलिसांचा अनुभव पण इथेच वाचला

    उत्तर द्याहटवा
  2. पोलिस भरती पासून हप्तावसुलीचं प्रशिक्षण मिळतं, त्यांचं सगळं लक्ष तिकडेच असतं. माझं पाकीट मारलं गेलं होतं. ते रिकामं केल्यावर पोलिसाना मिळालं, तेव्हा कोर्टातून मला बोलावणं आलं मुंबईहून नागपूरला आता बोला.

    उत्तर द्याहटवा
  3. mala khatri aahe ki asha prakarchya gunhyanmadhe pan police station che 'cut' jat asnar. paise vagalta etar aivaj tari milava ki nahi? me police station var tehi sangun aale ki mala paise nako baki milavun dya... pan mehnat kon ghenar... baki mumbai varun nagpurla rikam pakit ghyayla bolavan mhanje chhal aahe....

    उत्तर द्याहटवा