ब्लॉगवर आपले स्वागत आहे
बलात्कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बलात्कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

आश्‍वासक बापू


बलात्काराच्या घटना घडल्या नंतर अनेक चर्चा झाल्या. त्या सर्व चर्चांमध्ये अशा आरोपींना कोणती शिक्षा द्यावी, अशा केसेसचा निकाल किती जलद लागावा, स्त्रियांनी स्वतःजवळ मिरचीपूड, स्प्रे, चाकू-सुरे बाळगावे असे अनेक विचार पुढे झाले. पण जी स्त्री त्या घटनेतून जाते तिच्या मनात कोणती सुनामी येत असेल, तिच्या जवळच्या नातेवाईकांची अवस्था काय होत असेल ह्याची कल्पना खरच आपण करू शकत नाही. अशा घटना किती घडतात, किती समाजासमोर येतात, किती तक्रारी नोंदवल्या जातात आणि पुढे त्या तक्रारींच काय होत हे आपल्याला चांगलाच माहित आहे. आज स्त्रियांच्या बाजूने भक्कम उभी राहिलेली 'एकच' व्यक्ती मी पहिली आणि ती म्हणजे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू. परम्पुज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दिनांक ०३.०१.२०१३ रोजी केलेल्या प्रवचनात स्त्रियांना 'अभय' दिले आहे. त्या प्रवचन काही भाग श्री सामिरसिंह दत्तोपाध्ये यांच्या ब्लोग वर आला आहे. ती लिंक (आश्‍वासक बापू)येथे देत आहे आपल्या सर्वांसाठी. आज मी भयमुक्त आहे आणि खात्रीने सांगू शकते कि माझ्यावर असा प्रसंग कधीच येणार नाही.